Ahilyanagar News : अहिल्यानगर : संगमनेर परिसरात बिअर बार व मद्यदुकाने फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड करत मोठे यश मिळविले आहे. या कारवाईत ५ गुन्हे उघडकीस आणून ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात कलम ३०३ (२), ३३१(४) अन्वये ३ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात फिर्यादी किशोर बाळाजी डोके (रा. खंदरमाळवाडी, ता. संगमनेर) यांच्या हॉटेल निलायम बार येथे अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून ३ लाख सहा हजार १९० रुपये किमतीची विदेशी दारू, सिगारेट व सीसीटीव्ही डीव्हीआर चोरून नेला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार…
Author: Vinayak Lande
Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर : बोगस बियाणे व खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर केवळ परवाना निलंबन न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. पीकविमा कंपन्यांच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवरही कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे पाटील, विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक…
Mahavitran : अहिल्यानगर : इंधन बचतीसाठी महावितरणने पेट्रोल-डिझेल वाहनांना पर्याय म्हणून विद्युत वाहनांचा वापर सुरू केला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालकांनी ईव्हीवर ‘स्विच’ केले आहे. राज्य शासनाच्या ईव्ही धोरणानुसार महावितरणच्या ताफ्यात नवीन ईव्ही वाहने दाखल झाली असून आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांसाठीही केवळ विद्युत वाहनांचा वापर सुनिश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या आवाहनाला महावितरणने तत्काळ कृतीशील प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकून विद्युत वाहनांचा वापर सुरू केला आहे. राज्य शासनाच्या विद्युत…
Simhastha Kumbhmela : मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेत प्रति आखाडा ५ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली. कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, तसेच आखाड्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्यास मोबदला किंवा पर्यायी जमीन दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व १३…
Weather Update : अहिल्यानगर जिल्ह्यात १२ ते १४ मे दरम्यान तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी पिणे, उन्हात जाणे टाळणे व आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी काय करावे? तहान लागली नसली तरी दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घ्यावे. तसेच ताक, लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबूपाणी यांचा नियमित वापर करावा. घराबाहेर पडताना छत्री किंवा टोपीचा वापर करावा. शक्य असल्यास ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हापासून बचावासाठी हलके, पातळ व सुती…
Ashtavinayak Temple : पुणे : अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या जतन-संवर्धन व दुरुस्ती कामांमुळे मोरगावचे मयुरेश्वर, थेऊरचे चिंतामणी आणि सिद्धटेकचे सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरे ९ जून २०२६ पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान या कालावधीत मंदिरातील नित्यपूजा व धार्मिक विधी नियमित सुरू राहणार, मात्र भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही, असे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. अष्टविनायक मंदिरापैकी तीन मंदिरांचे जतन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टने शासनाचे आभार मानले आहेत. सध्या मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथे मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसरातील संवर्धन व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर…
Indurikar Maharaj : अहिल्यानगर : इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात झालेल्या चेनस्नॅचिंग प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगरने धडाकेबाज कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली. आरोपींकडून ११.५ ग्रॅम सोन्यासह मोबाईल व मोटारसायकल असा एकूण २ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाच्या सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. याबाबत माहिती अशी की, या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला खात्रीशीर माहिती मिळाली की, हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सागर…
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे बालविवाहविरोधी कारवाईला मोठे यश मिळाले आहे. एकाच दिवसात तब्बल ९ बालविवाह थांबविण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. नगर शहरासह विविध तालुक्यांमध्ये ही धडक मोहीम राबविण्यात आली. ३ मे २०२६ रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या अंतर्गत नगर शहरात ३, अकोले १, राहुरी १, श्रीगोंदा १, पाथर्डी १, नेवासा १ आणि नगर तालुका १ अशा एकूण ९ ठिकाणी बालविवाह रोखण्यात आले. या मोहिमेत पोलीस प्रशासन, ग्रामसेवक, सरपंच-उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाइन यांचा सक्रिय सहभाग राहिला. सर्व…
Rahuri Election : अहिल्यानगर : राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले यांनी १ लाख १२ हजार ५८७ मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला. २७ फेऱ्यांमध्ये पहिल्यापासून आघाडी कायम ठेवत भाजपने राहुरीतील आपला गड पुन्हा मजबूतपणे राखला अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भाजपने अक्षय कर्डिले यांच्यावर विश्वास टाकला होता. त्या विश्वासाला सार्थ ठरवीत अक्षय कर्डिले यांनी विरोधकांचा लाखोच्या मतांनी दारुण पराभव केला आहे. राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय…
Goda to Narmada Jalyatra : अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या भूमीतून सुरू झालेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा महेश्वर येथे मंत्रघोषात आणि नर्मदा आरतीच्या साक्षीने मंगल समारोप झाला. महाराष्ट्रातील १३० नद्यांचे जल नर्मदेत विसर्जित करत जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला असून, महाराष्ट्र–मध्यप्रदेशचे नाते अधिक दृढ झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र भूमीतून सुरू झालेल्या आणि गोदावरी मातेच्या उगमस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा नुकताच महेश्वर येथे अत्यंत मंगल, भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात समारोप झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही जलयात्रा आयोजित करण्यात आली. पाच…