Drug Free : अहिल्यानगर : जिल्ह्यात ड्रग्सविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून कारवाईसाठी तपास यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत अमली पदार्थांच्या ४० प्रकरणांमध्ये ५५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये आदी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी गिते म्हणाले, “शाळा व महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यावर भर द्यावा. तसेच ड्रग्स डिटेक्शन किट्स व टेस्टिंग केमिकल्स यांची उपलब्धता सुनिश्चित करून…
Author: Vinayak Lande
Mahavitaran : अहिल्यानगर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महावितरणकडून राज्यभरात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे वेगात सुरू आहेत. मात्र, दुपारच्या कडक उन्हात वीज बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने, ही सर्व कामे सकाळी ७ ते ११ या वेळेत करण्याचे निर्देश महावितरण मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. महावितरणकडून पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार आणि वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. साधारणतः ही कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्णत्वास जातात. मात्र, सध्या काही ठिकाणी सकाळी १० ते दुपारी २ किंवा ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवून कामे सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा…
Census : अहिल्यानगर : देशाच्या विकास नियोजनाचा पाया असलेल्या जनगणना प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये, जनगणना म्हणजे राष्ट्राचा आरसा आहे. यासाठी प्रगणकांनी अचूक व प्रामाणिकपणे माहिती नोंदवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या प्रगणक प्रशिक्षणाला भेट देत त्यांनी शिस्त, समन्वय आणि नम्र संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात प्रगणकांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण सत्राला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “जनगणना करताना नागरिकांशी संवाद साधताना नम्रता, संयम व विश्वासार्हता राखणे अत्यंत आवश्यक…
Rain Alert : अहिल्यानगर : जिल्ह्यात २४ व २५ एप्रिल रोजी काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. वादळी वारा व वीज चमकत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहणे टाळावे, तसेच वीजवाहक तारांपासून सुरक्षित अंतर राखावे. घराबाहेर पडताना शक्यतो इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळावा आणि लोखंडी वस्तूशी संपर्क टाळावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मोकळ्या मैदानात, शेतात किंवा उंच ठिकाणी उभे राहणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वीज खांब, ट्रान्सफॉर्मर, टॉवर,…
Goda, Narmada campaign :अहिल्यानगर : ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेमुळे जलव्यवस्थापनाच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे २५ एप्रिलला यात्रेचा प्रारंभ होणार आहे. चौंडी येथे आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, अलका अहिरराव, रवी अनासपुरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तळ्यांचे नूतनीकरण, गावतळी निर्मिती, पाणीसंवर्धन तसेच मंदिरांचा जीर्णोद्धार अशा माध्यमातून समाजासाठी भरीव कार्य केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे…
Census : अहिल्यानगर : आगामी राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले घरयादी गटनिश्चिती व सीमांकन तसेच नकाशे तयार करण्याचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जनगणनेसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात कोणतीही दिरंगाई चालणार नसून, आवश्यक तेथे सुटीच्या दिवशीही काम सुरू ठेवून २० एप्रिलच्या आत काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तसेच जनगणनेचे नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी तालुका व नगरपरिषदनिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. काही ठिकाणी काम संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने…
IMD weather update : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १८ ते २२ एप्रिल रोजी हवामान विभागाकडून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वादळ, विजांचा कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वाऱ्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असताना झाडाखाली उभे राहू नये व सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळाच्या वेळी कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये, तसेच विद्युतवाहक वस्तूंपासून दूर राहावे. वादळी हवामानात मोकळे मैदान, टॉवर्स, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण यांच्याजवळ थांबू नये. तसेच जाहिरात फलक परिसरात जाणे टाळावे. विजा चमकत असताना उघड्यावर अडकले असल्यास गुडघ्यावर बसून शरीराचा जमिनीशी संपर्क कमी ठेवावा, असेही प्रशासनाकडून…
Shri Indresh Upadhyay : अहिल्यानगर : कलीयुगाच्या प्रभावातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे नामचिंतन हाच सर्वोत्तम मार्ग आहे, असे प्रतिपादन वृंदावन निवासी परम श्रद्धेय पूज्य इंद्रेश उपाध्याय यांनी अहिल्यानगरमध्ये केले. दरम्यान, दहीहंडी फोडत झालेल्या भव्य नंदोत्सवात हजारो भाविक भक्तिरसात चिंब झाले. सावेडीतील मिस्कीन मळा येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या तृतीय पुष्पात ते बोलत होते. यावेळी दहीहंडी फोडत झालेल्या भव्य नंदोत्सव सोहळ्यात हजारो श्रोते भक्तिरसात चिंब झाले. कौशल्यादेवी गौरीशंकर गुप्ता, महेश गुप्ता आणि आयुष गुप्ता यांच्यातर्फे आयोजित या भागवत कथा सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सुधीर झालानी, किसनलाल बंग व प्रदीप पंजाबी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित भाविकांनी नंदोत्सवाची जय्यत तयारी केली होती.…
Dr. Babasaheb Ambedkar : स्वातंत्र्य समता, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजासाठी दीपस्तंभ आहेत. हे विचार जीवनात उतरवल्यासच सकारात्मक परिवर्तन शक्य होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, जात पडताळणी विभागाचे सदस्य सचिव अनिल तिदमे, व्याख्याते डॉ. बापू चंदनशिवे, सीएसआरडीचे डॉ. सुरेश मुगुटमल, संजय आरणे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “डॉ. आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले. देशातील…
Women’s Self-Help Groups : अहिल्यानगर : जिल्ह्यात महिला बचत गटांनी ‘लोकल टू ग्लोबल’ यशोगाथा साकारत १६८ कोटींच्या उद्दिष्टावर मात करून तब्बल ३५३ कोटी ९ लाख रुपयांचे विक्रमी कर्जवाटप केले. ३० हजारांहून अधिक बचत गटांशी ३ लाखांपेक्षा जास्त महिला जोडल्या गेल्या असून ‘लखपती दीदी’ अभियानातही अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यात सध्या ३० हजार ११२ बचत गट सक्रिय असून, त्यांच्याशी ३ लाख १५ हजारांहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे बँक कर्जवाटपासाठी १६८ कोटी २० लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात तब्बल ३५३ कोटी ९ लाख रुपयांचे विक्रमी कर्जवाटप झाले आहे. ही…