Census : अहिल्यानगर : देशाच्या विकास नियोजनाचा पाया असलेल्या जनगणना प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये, जनगणना म्हणजे राष्ट्राचा आरसा आहे. यासाठी प्रगणकांनी अचूक व प्रामाणिकपणे माहिती नोंदवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या प्रगणक प्रशिक्षणाला भेट देत त्यांनी शिस्त, समन्वय आणि नम्र संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.

