Tree plantation : वाराणसी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नुकताच राज्यातील पहिल्या ‘शहरी वन’ प्रकल्पाचा भव्य प्रारंभ झाला. सुजाबाद–डोमरी परिसरातील ३५० बीघा क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत एकाच वेळी ३ लाखांहून अधिक रोपांची लागवड करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या उपक्रमाची नोंद ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्यासाठी संबंधित टीम वाराणसीत दाखल झाली होती. विशेष म्हणजे या उपक्रमात महाराष्ट्रातील जय बाबाजी भक्त परिवारातील ६०० साधकांनी गंगा नदीच्या साक्षीने तब्बल दोन सेक्टरमध्ये वृक्षारोपण करून शहरी वन प्रकल्पात सहभाग नोंदवून शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे वाराणसी येथील शासनाने त्यांची दखल घेत त्यांचे अभिनंदन केले. जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने…
Author: Vinayak Lande
Narmada puran : नर्मदा मातेच्या दोन्ही तिरांवर मराठी भाषेत ‘नर्मदा पुराण’चा दिव्य संदेश पोहोचवत अहिल्यानगरचे ज्येष्ठ साहित्यिक-पत्रकार हभप मिलिंद महाराज चवंडके यांनी देशात ऐतिहासिक कीर्तिमान प्रस्थापित केले आहे. नर्मदा किनाऱ्यावर मराठीत प्रवचन करणारे ते भारतातील पहिले प्रवचनकार ठरले असून, त्यांच्या या अभूतपूर्व कार्याबद्दल नर्मदा भक्तांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नर्मदेची पायी परिक्रमा करताना आणि त्यानंतरही आलेल्या अद्भुत आध्यात्मिक अनुभूतीतून हभप मिलिंद महाराज चवंडके यांनी प्रवचन सेवेच्या माध्यमातून ज्ञानयज्ञ सुरू केला. या प्रवचन सेवेचाच एक भाग म्हणून नर्मदा मातेच्या कृपेने त्यांना नर्मदा पुराणावर थेट नर्मदा नदीच्या घाटांवर प्रवचन करण्याची संधी लाभल्याची अंगावर शहारे आणणारी घटना घडली. पुणे जिल्ह्यातील पाटण येथील…
Mahavitaran : अहिल्यानगर : स्मार्ट मीटर असलेल्या महावितरणच्या घरगुती ग्राहकांना टीओडी सवलत लागू आहे. त्यामुळे नाशिक परिमंडळातील सव्वातीन लाख घरगुती ग्राहकांना एक महिन्यात तब्बल ३२ लाख रुपयांची भरघोस सवलत मिळाली आहे. महावितरणच्या घरगुती ग्राहकांना सध्या लागू झालेल्या नवीन दरानुसार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दिवसा वापरलेल्या वीज वापरावर वीज बिलात टीओडी सवलत लागू आहे. नाशिक परिमंडळात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मंडळातील ३ लाख १८ हजार ८६१ स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना जानेवारी २०२६ या एका महिन्यात एकूण ३१ लाख ९३ हजार रुपयांची सवलत वीज बिलात मिळाली आहे. जुलै २०२५ पासून नाशिक परिमंडळ अंतर्गत नाशिक मंडळात १ लाख ५४ हजार…
milk adulteration : अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील रसायनापासून बनावट दूध तयार करणाऱ्या दूध संकलन केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेने नुकताच छापा टाकला. या कारवाईत तब्बल 17 लाख 32 हजार 816 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक दूध भेसळ प्रकरणांचा तपास करत होते. त्यावेळी रामदास नवनाथ उबाळे (रा. फक्राबाद, ता. जामखेड) हा त्याच्या दूध संकलन केंद्रात रसायनापासून दूध तयार करून ते संकलित दुधात मिसळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांच्या…
PM Kisan Yojana : पीएम किसान याेजनेचा (PM Kisan Yojana)२२ वा हप्ता कधी येणार, असा प्रश्न विचारला जात असताना महत्त्वाची अपडेट समाेर आली आहे. किसान सन्मान निधीचा हप्ता सरकारकडून काेणत्याही क्षणी जमा हाेईल. मात्र, त्याआधी शेतकऱ्यांनी केवायसी (KYC)करणे अनिवार्य आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या (Farmer)खात्यात पीएम किसान निधीची रक्कम जमा हाेणार नाही. अवश्य वाचा : शिक्षकी पेशाला काळीमा; चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार पीएम किसान निधीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असताे. सध्या फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधी मिळण्याचे संकेत आहे. केंद्र सरकारकडून या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६,००० रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात, जे दर चार महिन्यांनी थेट लाभार्थी खात्यात जमा होतात.…
Shirdi Crime : अहिल्यानगर : शिर्डीत (Shirdi) बाबन बंगले येथील प्रतिष्ठित परिसरात पाेलिसांनी हाॅटेल पवनधाम येथे छापा टाकत हायटेक देहव्यापाराचा (Prostitution)पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून हाॅटेल मालकासह दाेन जणांना अटक केली आहे. पाेलिसांनी (Police) अनैतिक देहविक्रय प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली असून संबंधित हाॅटेलही सील करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. अवश्य वाचा : शिक्षकी पेशाला काळीमा; चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार देवाचे गाव म्हणून जगविख्यात असलेले शिर्डीचे नाव काही अपप्रवृत्तीमुळे खराब हाेत आहे. शिर्डीतील पवनधाम हाॅटेलमध्ये साेशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करून अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली. त्याआधारे उपविभागीय…
Crime News : अहिल्यानगर : शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील श्रीरापुरात एका शिक्षकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैगिंक अत्याचार (sexual assault) केल्याप्रकरणी पाेक्साे कायद्यांतर्गत श्रीरामपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शाळेतील सुरक्षतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. आराेपीला पाेलिसांनी (Police)अटक केली असून महिला अधिकाऱ्याकडून चोकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती आहे. अवश्य वाचा : धक्कादायक ! शेगावसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री दर्शनासाठी आलेल्या तरुणीवर लॉजवर बलात्कार राज्यात विद्येच्या मंदिरात मुलींसोबत वारंवार गैरवर्तनाच्या घटना घडत आहेत. याबाबत माहिती अशी की, एका विद्यार्थिनीने लैगिंक अत्याचाराबाबत कुटुंबीयांना सांगितल्यानंतर या प्रकरणाला…
Police : अहिल्यानगर : गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल व गोमांस वाहतूक करणाऱ्या राहता तालुक्यातील ममदापूर येथील आठ जणांच्या टोळीला अहिल्यानगर जिल्ह्यातून तब्बल १८ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हद्दपार केलेल्या प्रकरणात टोळी प्रमुख फैजान जब्बार कुरेशी (शेख) (वय २५, रा. कुरेशी मोहल्ला, ममदापूर, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) याच्यासह मुन्तजीर मुनिर कुरेशी (वय २३), अब्दुलकरीम अमिर कुरेशी (वय ५२), मुनिर अमिर कुरेशी (वय ५६), जब्बार हसन कुरेशी (शेख) (वय २३), नाजीम आयुब कुरेशी (वय ३३), वसीम आयुब कुरेशी (वय २७) आणि रिजवान महेबुब कुरेशी (वय २५)…
Devendra Fadnavis : अहिल्यानगर : स्वतंत्र व आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या प्रवासात तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्राचा वाटा मोलाचा ठरणार आहे. या प्रवासात महाराष्ट्र भक्कम पाऊले टाकत आहे. दावोस कराराच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यात 11 हजार 519 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. याद्वारे 18 हजार रोजगाराची निर्मिती होणार असून उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 75 हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी येथे ‘तौरल इंडिया’च्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते…
Ahilyanagar : अहिल्यानगर : महावितरण विभागाकडून महत्त्वाच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महावितरण विभागाकडून देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी आज सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात आला. दरम्यान, या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहिल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता आल्या नाही. त्यामुळे आज शनिवार (ता. 7) रोजी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता, पाइपलाइन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रस्ता, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यांवरील शिवाजीनगर परिसर भागास सकाळी 11 नंतरच्या पाणी वाटपाच्या…