PM Surya Ghar Yojana : अहिल्यानगर : घराघरांत सौरऊर्जेचा प्रकाश पोहोचवत महाराष्ट्राने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. एका दिवसात तब्बल ४,७०० घरांवर सौर प्रकल्प उभारण्याचा विक्रम करत राज्याने हरित ऊर्जेच्या क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राने मे महिन्यात देशातील सर्वाधिक ४ लाख ४९ हजार अर्ज प्राप्त केले. तसेच सौर प्रकल्पांच्या तपासणीत प्रथम, कंत्राटदार नोंदणीत द्वितीय आणि एकूण प्रकल्प उभारणीत द्वितीय क्रमांक पटकावत महाराष्ट्राने देशातील टॉप पाच राज्यांमध्ये दमदार उपस्थिती नोंदविली आहे. केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्याच्या या यशाबद्दल अभिनंदन…
Author: Vinayak Lande
LPG prices : व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरांनी अवघ्या पाच महिन्यांत दुप्पट उसळी घेतल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसायासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅस दरवाढीने महागाईच्या आगीत आणखी तेल ओतले आहे. नव्या दरानुसार, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ४२ रुपयांची वाढ होऊन तो आता ३,११३.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात सर्वाधिक ५३.५० रुपयांची वाढ झाली असून तेथील दर ३,२५५.५० रुपयांवर पोहोचले आहेत. केवळ मोठ्या सिलेंडरपुरतेच हे संकट मर्यादित नसून, ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही ११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत हा सिलेंडर आता ८२१.५० रुपयांना मिळणार असून, विद्यार्थी, नोकरदार आणि एकटे राहणाऱ्या नागरिकांच्या…
Rain Alert : अहिल्यानगर : जिल्ह्यावर पुढील चार दिवस अवकाळी संकटाचे सावट असून विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाच्या शक्यतेमुळे हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. नागरिकांसह शेतकऱ्यांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३१ मे ते ३ जूनदरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटा वेळी झाडाखाली, मोकळ्या मैदानात किंवा उंच धातूच्या संरचनांजवळ थांबू नये. वीजेचे खांब, टॉवर, रोहित्र, लोंबकळणाऱ्या केबल्स तसेच विद्युत उपकरणांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात…
Ahilyanagar News : अहिल्यानगर : बालविवाह रोखण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा धडक अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असून, वर्षभरात तब्बल ५५ बालविवाह हाणून पाडण्यात प्रशासनाला यश आले. कायद्याचा धाक दाखवत १५ कुटुंबांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आल्याने बालविवाहाविरोधातील मोहीम अधिक आक्रमक झाली आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी ही माहिती दिली. बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हाभर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, पथनाट्य, पोस्टर्स, चिकटपत्रके, शपथ अभियान आदी विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत बालविवाह विरोधी…
Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून शांतता, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर देण्यात आला आहे. नियमभंग, विनापरवाना वाहतूक आणि अनधिकृत कत्तलीवर कठोर कारवाईचा इशारा देत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समिती व प्राणी क्लेश प्रतिबंधक जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त उमेश पाटील, सहायक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे, अन्न व औषध निरीक्षक जी. बी. भोर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. आशिया म्हणाले, “सण उत्साहात साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार…
Cheque Bounce : अहिल्यानगर : धनादेश अनादर प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. जी. सोनी यांनी वैष्णवी विकेश गायकवाड हिला ३ महिन्यांची साधी कैद व ६ लाख ५४ हजार ६३७ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. रक्कम न भरल्यास आरोपी महिलेस आणखी ६ महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार असल्याचा निकाल न्यायालयाने सुनावला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी महिला वैष्णवी विकेश गायकवाड व फिर्यादी रोहित राजेंद्र बडे यांनी भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता. काही कारणांमुळे रोहित बडे यांनी व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना देय रक्कम निश्चित करण्यात आली. ती रक्कम देण्यासाठी आरोपी महिलेने फिर्यादीस धनादेश दिला. मात्र हा धनादेश बँकेत जमा…
Crime : अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील भांडगाव येथे खून करून १२ लाख ७० हजार रुपयांची जबरी चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक करून गुन्हा उघडकीस आणला. आरोपीकडून रोख रक्कम, मोबाईल व दुचाकीसह एकूण १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पारनेर पोलीस ठाण्यात कलम १०३ (१), ३०९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी सिद्धेश संदीप खरमाळे (रा. भुजवळवस्ती, भांडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या वडिलांवर अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने डोक्यात हत्याराने मारहाण करून त्यांना ठार केले व घरातील १२ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरून…
Ahilyanagar News : अहिल्यानगर : संगमनेर परिसरात बिअर बार व मद्यदुकाने फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड करत मोठे यश मिळविले आहे. या कारवाईत ५ गुन्हे उघडकीस आणून ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात कलम ३०३ (२), ३३१(४) अन्वये ३ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात फिर्यादी किशोर बाळाजी डोके (रा. खंदरमाळवाडी, ता. संगमनेर) यांच्या हॉटेल निलायम बार येथे अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून ३ लाख सहा हजार १९० रुपये किमतीची विदेशी दारू, सिगारेट व सीसीटीव्ही डीव्हीआर चोरून नेला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार…
Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर : बोगस बियाणे व खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर केवळ परवाना निलंबन न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. पीकविमा कंपन्यांच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवरही कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे पाटील, विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक…
Mahavitran : अहिल्यानगर : इंधन बचतीसाठी महावितरणने पेट्रोल-डिझेल वाहनांना पर्याय म्हणून विद्युत वाहनांचा वापर सुरू केला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालकांनी ईव्हीवर ‘स्विच’ केले आहे. राज्य शासनाच्या ईव्ही धोरणानुसार महावितरणच्या ताफ्यात नवीन ईव्ही वाहने दाखल झाली असून आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांसाठीही केवळ विद्युत वाहनांचा वापर सुनिश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या आवाहनाला महावितरणने तत्काळ कृतीशील प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकून विद्युत वाहनांचा वापर सुरू केला आहे. राज्य शासनाच्या विद्युत…