IMD weather update : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १८ ते २२ एप्रिल रोजी हवामान विभागाकडून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वादळ, विजांचा कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वाऱ्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असताना झाडाखाली उभे राहू नये व सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळाच्या वेळी कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये, तसेच विद्युतवाहक वस्तूंपासून दूर राहावे. वादळी हवामानात मोकळे मैदान, टॉवर्स, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण यांच्याजवळ थांबू नये. तसेच जाहिरात फलक परिसरात जाणे टाळावे. विजा चमकत असताना उघड्यावर अडकले असल्यास गुडघ्यावर बसून शरीराचा जमिनीशी संपर्क कमी ठेवावा, असेही प्रशासनाकडून…
Author: Vinayak Lande
Shri Indresh Upadhyay : अहिल्यानगर : कलीयुगाच्या प्रभावातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे नामचिंतन हाच सर्वोत्तम मार्ग आहे, असे प्रतिपादन वृंदावन निवासी परम श्रद्धेय पूज्य इंद्रेश उपाध्याय यांनी अहिल्यानगरमध्ये केले. दरम्यान, दहीहंडी फोडत झालेल्या भव्य नंदोत्सवात हजारो भाविक भक्तिरसात चिंब झाले. सावेडीतील मिस्कीन मळा येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या तृतीय पुष्पात ते बोलत होते. यावेळी दहीहंडी फोडत झालेल्या भव्य नंदोत्सव सोहळ्यात हजारो श्रोते भक्तिरसात चिंब झाले. कौशल्यादेवी गौरीशंकर गुप्ता, महेश गुप्ता आणि आयुष गुप्ता यांच्यातर्फे आयोजित या भागवत कथा सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सुधीर झालानी, किसनलाल बंग व प्रदीप पंजाबी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित भाविकांनी नंदोत्सवाची जय्यत तयारी केली होती.…
Dr. Babasaheb Ambedkar : स्वातंत्र्य समता, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजासाठी दीपस्तंभ आहेत. हे विचार जीवनात उतरवल्यासच सकारात्मक परिवर्तन शक्य होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, जात पडताळणी विभागाचे सदस्य सचिव अनिल तिदमे, व्याख्याते डॉ. बापू चंदनशिवे, सीएसआरडीचे डॉ. सुरेश मुगुटमल, संजय आरणे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “डॉ. आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले. देशातील…
Women’s Self-Help Groups : अहिल्यानगर : जिल्ह्यात महिला बचत गटांनी ‘लोकल टू ग्लोबल’ यशोगाथा साकारत १६८ कोटींच्या उद्दिष्टावर मात करून तब्बल ३५३ कोटी ९ लाख रुपयांचे विक्रमी कर्जवाटप केले. ३० हजारांहून अधिक बचत गटांशी ३ लाखांपेक्षा जास्त महिला जोडल्या गेल्या असून ‘लखपती दीदी’ अभियानातही अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यात सध्या ३० हजार ११२ बचत गट सक्रिय असून, त्यांच्याशी ३ लाख १५ हजारांहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे बँक कर्जवाटपासाठी १६८ कोटी २० लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात तब्बल ३५३ कोटी ९ लाख रुपयांचे विक्रमी कर्जवाटप झाले आहे. ही…
Avdhut Dada Guru : अहिल्यानगर : मां नर्मदाचे परम उपासक आणि महायोगी, अवधूत संत श्री दादागुरु महाराज यांचे अहिल्यानगरमध्ये प्रथमच आगमन होत असल्याने भक्तगणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नर्मदा परिक्रमा आणि नर्मदा संवर्धनासाठी सतत पायी प्रवास करणारे दादा गुरुंच्या पावन सानिध्यात दर्शन व आशीर्वादाची पर्वणी भक्तांना लाभत आहे. तरी जास्तीत जास्त भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गौरव हरबा व रुपेश हरबा यांनी केले आहे. अवधूत संत दादागुरु महाराज यांचे अहिल्यानगर शहरात उद्या (ता. १०) रोजी सकाळी ११ वाजता आई तुळजाभवानी कॉलनी, सारसनगर येथे आगमन होणार आहे. संत दादागुरु महाराज गेल्या पाच वर्षांपासून निराहार आहेत. त्यांनी अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही.…
Radhakrishna Maharaj : अहिल्यानगर : अलिकडे उभारल्या जाणाऱ्या शानदार बंगल्यांत भव्यता वाढत असली, तरी स्वयंपाकघरातील पवित्रता कमी होत चालली आहे, असे स्पष्ट मत प.पू. श्रीराधाकृष्ण महाराजांनी व्यक्त केले. स्वयंपाकघर हे ईश्वराचे प्राकट्य असून सात्त्विक अन्न व शुद्धता हीच घरातील समाधानाची खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. नगर येथील रामनिवास सतीशचंद्र इंदाणी व इंदाणी परिवारातर्फे नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या द्वितीय पुष्पगुंफण प्रसंगी ते बोलत होते. राधाकृष्ण महाराज म्हणाले, “स्वयंपाकघर भव्य नव्हे, तर सदैव पवित्र असले पाहिजे. “रस के रूप में ईश्वर प्रगट होते है, उसे रसोई कहते हैं. रसोई घर ईश्वर का प्राकट्य है,”…
Saklai Irrigation Scheme : अहिल्यानगर : अहिल्यानगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३२ गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजनेला आज (बुधवार) मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे १२३४ कोटींच्या या प्रकल्पामुळे ९६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून हिवरे झरे परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला. तब्बल अनेक दशकांपासून प्रलंबित असलेली ही योजना अखेर मंजूर झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६ एप्रिल २०१९ रोजी वाळकी येथे झालेल्या सभेत साकळाई योजनेला मंजुरी देण्याचा शब्द दिला होता. सात वर्षांनंतर तो शब्द पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला…
Nath Sampradaya : अहिल्यानगर : “नाथ संप्रदायाचे मूळ स्वरूप अत्यंत उदात्त असून ते भगवान शिव यांच्यापासून सुरू झालेली एक प्राचीन भारतीय शैव आणि योग परंपरा आहे. हा संप्रदाय सर्वव्यापी आणि योगधारणेवर उभा असलेला संप्रदाय असून महाराष्ट्रात तो भक्तीमार्गाच्या वाटेने अधिक दृढपणे रुळला आहे,” असे प्रतिपादन मिलिंद महाराज चवंडके यांनी केले. भिंगार येथील नेहरू चौकात श्री कानिफनाथ अस्थाना देवस्थानतर्फे आयोजित श्री नवनाथ महात्म्य निरूपण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी दीपक नायकू यांनी स्वागत केले. सागर लालबोंद्रे यांनी परिचय करून दिला. सचिन बिडकर व रामभाऊ पांढरे यांच्या हस्ते महाराजांचा सन्मान करण्यात आला. कारभारी भीम लालबोंद्रे यांनीही त्यांचा गौरव केला. मिलिंद महाराज पुढे…
Voter ID Proofs : अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानासाठी मतदारांकडे मतदार ओळखपत्र (EPIC) असणे आवश्यक आहे. मात्र, मतदानाच्या दिवशी एखाद्या मतदाराकडे मतदार ओळखपत्र उपलब्ध नसल्यास त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार नाही. यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त बारा पर्यायी कागदपत्रांना मतदानासाठी ग्राह्य धरले आहे. यापैकी कोणताही एक दस्तऐवज सादर करून मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात, असे निवडणूक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयोगाच्या सूचनेनुसार विशेष बाब म्हणजे ज्या मतदारांनी भारतीय पासपोर्टच्या आधारे मतदार यादीत नाव नोंदवले आहे, त्यांना मतदान केंद्रावर मूळ पासपोर्टच दाखवणे बंधनकारक असून इतर कोणताही पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मतदानासाठी…
IMD weather update : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ३०-३१ मार्च रोजी ‘ऑरेंज’ तर १-२ एप्रिल रोजी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वादळ, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा व गारपीट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असताना झाडाखाली उभे राहू नये व सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळाच्या वेळी कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये, तसेच विद्युतवाहक वस्तूंपासून दूर राहावे. वादळी हवामानात मोकळे मैदान, टॉवर्स, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण यांच्याजवळ थांबू नये. तसेच जाहिरात फलक परिसरात जाणे टाळावे. विजा चमकत असताना उघड्यावर अडकले असल्यास गुडघ्यावर बसून शरीराचा जमिनीशी संपर्क कमी ठेवावा, असेही…