Mahavitaran : अहिल्यानगर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महावितरणकडून राज्यभरात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे वेगात सुरू आहेत. मात्र, दुपारच्या कडक उन्हात वीज बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने, ही सर्व कामे सकाळी ७ ते ११ या वेळेत करण्याचे निर्देश महावितरण मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

