Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Maharashtra Rain Alert : राज्यात वादळी पावसाचा अलर्ट; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : राज्यात वादळी पावसाचा अलर्ट; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

Maharashtra Rain Alert : राज्यात वादळी पावसाचा अलर्ट; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 27, 2026Updated:March 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260327 WA0013
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Maharashtra Rain Alert : अहिल्यानगर : हवामान विभागाने वर्तवलेल्या भाकितानुसार राज्यात आठवडाभर आभाळी हवामान राहणार आहे. तसेच ३० व ३१ मार्च रोजी राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Alert : राज्यात वादळी पावसाचा अलर्ट; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
Maharashtra Rain Alert : राज्यात वादळी पावसाचा अलर्ट; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
३० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन विजाच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. ३१ मार्च रोजी देखील राज्याच्या काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शेतीची कामे नियोजित करावी : कृषी विभाग

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026

Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी

April 9, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.