अहिल्यानगर : यंदाचा प्रजासत्ताक दिन चांगलाच आगळा-वेगळा ठरला. याचे कारण म्हणजे ‘राष्ट्रप्रथम’ या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर येथील पाेलीस परेड मैदानावर नगर शहरातील २५ शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर कवायत व संचलन केले. एकाच लयातील संचलन पाहून उपस्थित नागरिक अक्षरशः भारावून गेले.
या कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन पाहून त्यांनी थेट मैदानात उतरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शिक्षकांचेही कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून पालकमंत्री विखे पाटील यांनी स्वतः फोटो काढत या क्षणांचे स्मरण जपले. हा उपक्रम शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून साकार झाला. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली फक्त नगर शहरातच नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो शाळांमध्ये एकाच वेळी ‘राष्ट्रप्रथम’ उपक्रम राबवण्यात आला.जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
