Goda to Narmada Jalyatra : अहिल्यानगर :
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या भूमीतून सुरू झालेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा महेश्वर येथे मंत्रघोषात आणि नर्मदा आरतीच्या साक्षीने मंगल समारोप झाला. महाराष्ट्रातील १३० नद्यांचे जल नर्मदेत विसर्जित करत जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला असून, महाराष्ट्र–मध्यप्रदेशचे नाते अधिक दृढ झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सांगितले.

