Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन
अहिल्यानगर

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन
Vinayak LandeBy Vinayak LandeApril 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260415 WA00071
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Shri Indresh Upadhyay : अहिल्यानगर : कलीयुगाच्या प्रभावातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे नामचिंतन हाच सर्वोत्तम मार्ग आहे, असे प्रतिपादन वृंदावन निवासी परम श्रद्धेय पूज्य इंद्रेश उपाध्याय यांनी अहिल्यानगरमध्ये केले. दरम्यान, दहीहंडी फोडत झालेल्या भव्य नंदोत्सवात हजारो भाविक भक्तिरसात चिंब झाले.

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन
Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन
सावेडीतील मिस्कीन मळा येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या तृतीय पुष्पात ते बोलत होते. यावेळी दहीहंडी फोडत झालेल्या भव्य नंदोत्सव सोहळ्यात हजारो श्रोते भक्तिरसात चिंब झाले. कौशल्यादेवी गौरीशंकर गुप्ता, महेश गुप्ता आणि आयुष गुप्ता यांच्यातर्फे आयोजित या भागवत कथा सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सुधीर झालानी, किसनलाल बंग व प्रदीप पंजाबी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित भाविकांनी नंदोत्सवाची जय्यत तयारी केली होती.
व्यासपीठासमोरील प्रशस्त मंडपात तब्बल १५ आकर्षक दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या.
पूज्य इंद्रेश उपाध्याय पुढे म्हणाले, “जुगार, पैज लावणे, मदिरापान, व्यसनाधीनता, मांसाहार, हिंसा, खोटे बोलणे, अनैतिक कर्म व परस्त्रीगमन हे सर्व कलीयुगाच्या प्रभावाखाली येते. लक्ष्मीदेवीला समोर ठेवून जुगार खेळणे अथवा पैज लावणे यामुळे प्रत्यक्ष नारायण क्रोधित होतात. मांसाहार ही हिंसाच असल्याने महापाप आहे. नशा देणाऱ्या पदार्थांपासून नेहमी दूर राहा, देवतांशी नशेचा संबंध जोडू नका, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
आई-वडील आणि गुरु यांचा आदर करणे हे जीवनातील सर्वोच्च कर्तव्य असून त्यांचा शब्द प्रमाण मानल्यास कल्याण निश्चित होते. संत, साधू, महात्मे, भक्त आणि मंदिर यांची चेष्टा कधीही करू नका, असे आवाहनही इंद्रेश उपाध्याय महाराजांनी केले.

भगवंताच्या नामस्मरणाने जीवनाचे सार्थक

“भगवंताच्या नामस्मरणाने जीवनाचे कल्याण होते. अखेरचा श्वास घेताना मुखातून भगवंताचे नाव निघाले तरच मुक्ती मिळते. भगवंत भक्तांच्या डोळ्यातील अश्रू पाहू शकत नाहीत. वृंदावनात २४ तास राहिल्यास भगवान श्रीकृष्णांची भेट होतेच, मात्र त्या भेटीचा आनंद घेता आला पाहिजे. प्रेम करावेसे वाटले तर विठ्ठलावर, पांडुरंगावर, श्रीकृष्णावर प्रेम करा. भगवंताचे प्रेम मिळाले की इतर कोणत्याही अपेक्षा राहत नाहीत आणि जीवन सार्थक होते”, असे इंद्रेश उपाध्याय यांनी सांगितले.
दरम्यान, २१ दिवसांच्या नंदोत्सवाची माहिती दिल्यानंतर इंद्रेश उपाध्याय यांनी स्वतः दहीहंडी फोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित भाविकांनी नंदोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. कर्णमधूर संगीताचे सूर आणि श्रीकृष्ण नामाचा जयजयकार यामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. शहराच्या इतिहासात प्रथमच असा शाही नंदोत्सव सोहळा झाल्याच्या प्रतिक्रिया भाविकांमधून उमटल्या.

भगवंताच्या नामस्मरणाने जीवनाचे सार्थक

“भगवंताच्या नामस्मरणाने जीवनाचे कल्याण होते. अखेरचा श्वास घेताना मुखातून भगवंताचे नाव निघाले तरच मुक्ती मिळते. भगवंत भक्तांच्या डोळ्यातील अश्रू पाहू शकत नाहीत. वृंदावनात २४ तास राहिल्यास भगवान श्रीकृष्णांची भेट होतेच, मात्र त्या भेटीचा आनंद घेता आला पाहिजे. प्रेम करावेसे वाटले तर विठ्ठलावर, पांडुरंगावर, श्रीकृष्णावर प्रेम करा. भगवंताचे प्रेम मिळाले की इतर कोणत्याही अपेक्षा राहत नाहीत आणि जीवन सार्थक होते”, असे इंद्रेश उपाध्याय यांनी सांगितले.
Ahilyanagar Shikrishna Shri Indresh Upadhyay Spiritual Spiritual Gathering Vrundavan
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026

Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026

Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी

April 9, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.